मोठ्या परताव्याच्या आमिषाने १२ जणांची ४७ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:56 PM2018-10-17T23:56:45+5:302018-10-17T23:57:22+5:30

दरमहा सात टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून १२ जणांची ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विजयनगर येथील कॅपिटल ग्रोथ कंपनीच्या दोन संचालकांविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा नोंदविण्यात आला.

Big loss of 12 bribe of Rs 47 lakh fraud | मोठ्या परताव्याच्या आमिषाने १२ जणांची ४७ लाखांची फसवणूक

मोठ्या परताव्याच्या आमिषाने १२ जणांची ४७ लाखांची फसवणूक

googlenewsNext

औरंगाबाद : दरमहा सात टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून १२ जणांची ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विजयनगर येथील कॅपिटल ग्रोथ कंपनीच्या दोन संचालकांविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा नोंदविण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत असून, आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला.
रत्नेश प्रभाकरराव हस्तक (वय ५७, रा. एन-९, एम-२, ज्ञानेश्वरनगर, हडको) आणि अजय अशोक जोशी (रा. ब्रीजवाडी), अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उल्कानगरी येथील रहिवासी प्रवीण प्रभाकरराव हस्तक हे आॅटोमोबॉईल गॅरेज चालवितात. २०१५ मध्ये त्यांच्या ओळखीच्या एका जणाने त्यांना सांगितले होते, तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर विजयनगर येथील ग्रोथ कॅपिटल या कंपनीत कर, ते चांगला परतावा देतात. त्यामुळे तक्रारदारांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन गुंतवणूक योजनेविषयी माहिती जाणून घेतली. त्यावेळी आरोपींनी त्यांना गुंतविलेल्या रकमेवर दरमहा सात टक्के दराने अठरा महिने व्याज देतो. त्यानंतर तुम्हाला तुमची रक्कम परत करतो, असे सांगितले. विशेष म्हणजे हे व्याज दरमहा तुमच्या बँक खात्यात जमा केले जाईल, असे नमूद के ले. रक्कम परत करण्यासाठी पुढील तारखेचा धनादेशही आगाऊ प्रदान करतो, असे सांगितल्याने तक्रारदारांनी आरोपीच्या कंपनीत ३ लाख रुपये भरले. त्यांच्याप्रमाणेच दिलीप भीमराव निकम, धन्वंतरी निकम, शांताराम पाटील, चंद्र्रनील परब, गणेश वाघमारे, भीमराव शेणफडू पाटील, चंद्रकांत विक्रम पाटील, योगिनी भामरे, पराग रत्नपारखी, मिलिंद मुळे, विजय धोटे यांच्यासह इतरांकडून वेगवेगळ्या, असे एकूण ४४ लाख रुपये त्यांनी घेतले. प्रवीण यांच्याप्रमाणे अन्य एकाही तक्रारदाराच्या बँक खात्यात आरोपींनी एक रुपयाही जमा केला नाही. यामुळे तक्रारदारांनी आरोपींना भेटून व्याजाच्या रकमेची वेळोवेळी मागणी केली असता प्रत्येक वेळी ते वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेत. दरम्यान, मुदत संपल्यानंतरही आरोपींनी व्याज न दिल्याने तक्रारदारांनी त्यांना मुद्दल रकमेची मागणी केली. तेव्हा त्यांनी मुद्दल देण्यासही नकार दिला.
धनादेश झाले अनादरित
आरोपींनी तक्रारारदांना मुद्दल रकमेचे धनादेश दिले होते. हे धनादेश तक्रारदारांनी बँकेत जमा केले असता ते न वटता परत आले. धनादेश अनादरित झाल्यामुळे आरोपींनी आपली मुद्दामहून आणि कट रचून फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदविली. निरीक्षक श्रीकांत नवले तपास करीत आहेत.

Web Title: Big loss of 12 bribe of Rs 47 lakh fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.