शिवारात पेरण्यांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:12 AM2018-06-29T01:12:23+5:302018-06-29T01:13:33+5:30

मृग कोरडा गेल्यानंतर उशिरा का होईना, जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. अद्याप मान्सून सक्रिय झालेला नाही. मात्र, सर्वच तालुक्यात १०० मिमीच्या वर पाऊस झाल्याने शिवारात या दोन दिवसांत पेरणीची लगबग वाढली आहे.

The sowing of sewad | शिवारात पेरण्यांची लगबग

शिवारात पेरण्यांची लगबग

Next
ठळक मुद्देखरीप हंगाम : उशिरा पावसामुळे मूग, उडीद कमी, सोयाबीनची क्षेत्रवाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मृग कोरडा गेल्यानंतर उशिरा का होईना, जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. अद्याप मान्सून सक्रिय झालेला नाही. मात्र, सर्वच तालुक्यात १०० मिमीच्या वर पाऊस झाल्याने शिवारात या दोन दिवसांत पेरणीची लगबग वाढली आहे. सद्यस्थितीत दोन लाख हेक्टरमध्ये पेरण्या आटोपल्या. ही टक्केवारी २७ आहे. यामध्ये सर्वाधिक ९६ हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे आहे.
मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने पिकांत फेरपालट होत असला तरी कपाशीचे क्षेत्र मात्र सध्या स्थिर राहणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यंदाच्या खरिपामध्ये जिल्ह्यात ७ लाख २८ हजार हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र राहणार आहे. यामध्ये मुगाचे ३३ हजार हेक्टर व उडिदाचे ३० हजार हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. जिल्ह्यात साधारणपणे जूनच्या दुसऱ्या वा तिसºया आठवड्यापर्यंत मूग, उडिदाची पेरणी केली जाते. यामुळे ६० दिवसाच्या अल्प कालावधीतील मूग व उडदाची पिकांचे क्षेत्र कमी होऊन ते सोयाबीनमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता असल्याचे कृषी विद्यापीठाने सांगीतले.
जिल्ह्यात यंदा दोन लाख ९५ हजार हेक्टरपर्यंत सोयाबीनचे क्षेत्र प्रस्तावित आहे. मध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे, तर कपाशीचे १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाही. तूर्तास हेच क्षेत्र कायम राहणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
दोन लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी
यंदाच्या हंगामासाठी ७.२८ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यापैकी २.३१ लाख हेक्टरमध्ये पेरणी आटोपली. यामध्ये सर्वाधिक ९६ हजार ३२४ हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे आहे. कपाशी ५८ हजार ९१८, धान २ हजार ३८४, ज्वारी ४ हजार ५४९, मका ४ हजार ४०२, तूर ३२ हजार ४३४, मूग ३ हजार ५१५, उडीद ९९५, भुईमूग १६२ व इतर पिकांचे ५०२ हेक्टर क्षेत्र आहे.
जिल्ह्यात सरासरी १५४ मिमी पाऊस
जिल्ह्यात गुरुवारपर्यंत १३६ मिमी पाऊस अपेक्षित असताना १५४ मिमी पाऊस पडला. ही ११३ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच दिनांकाला ९०.२ मिमी पाऊस झाला. सद्यस्थितीत अमरावती १३७, भातकुली १३०, नांदगाव खंडेश्वर २१७, चांदूर रेल्वे १८८, धामणगाव रेल्वे १४१, तिवसा १०५, मोर्शी १३१, वरूड १२६, अचलपूर २१८, चांदूर बाजार १४८, दर्यापूर १५७, अंजनगाव सुर्जी १५८, धारणी १०५ व चिखलदरा तालुक्यात १९० मिमी पाऊस पडला. हा पाऊस पेरणीयोग्य असल्याचे कृषितज्ज्ञांनी सांगितले.

Web Title: The sowing of sewad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.