खरिपाला हवे १.५१ लाख क्विंटल बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:43 PM2018-04-17T23:43:48+5:302018-04-17T23:44:14+5:30

यंदाच्या खरीप हंगामाला किमान १ लाख ५१ हजार ९९३ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यापैकी ७१ हजार ४९० क्विंटल बियाणे सार्वजनिक, ८० हजार ५०३ क्विंटल खासगी, तर ६६ हजार ३९० क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

Kharipala wants 1.51 lakh quintals of seed | खरिपाला हवे १.५१ लाख क्विंटल बियाणे

खरिपाला हवे १.५१ लाख क्विंटल बियाणे

Next
ठळक मुद्देसोयाबीनला सर्वाधिक मागणी : महाबीजचे ६६ हजार क्विंटल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामाला किमान १ लाख ५१ हजार ९९३ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यापैकी ७१ हजार ४९० क्विंटल बियाणे सार्वजनिक, ८० हजार ५०३ क्विंटल खासगी, तर ६६ हजार ३९० क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टरक्षेत्र प्रस्तावित आहेत. यासाठी खते-बियांण्यांचे नियोजन कृषी विभागाद्वारा सुरू आह. गतवर्षीच्या तुलनेत यंदा क्षेत्रवाढ होत असल्याने बियाण्यांची मागणीदेखील वाढणार आहे. यापूर्वी २०१५ मध्ये १.१७ लाख क्विंटल, २०१६ मध्ये १.४३ लाख क्विंटल, २०१७ मध्ये १.३१ लाख क्विंटल बियाणे लागले होते. यंदांच्या हंगामात क्षेत्रवाढीची शक्यता असल्याने किमान १.५१ लाख क्विंटल बियाणे लागण्याची शक्यता आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १३ हजार ४९४ क्विंटल, भातकुली १२ हजार ६९५, नांदगाव खंडेश्वर १८ हजार १९७, चांदूर रेल्वे १२ हजार ७९६, तिवसा १० हजार ७६३, धामणगाव रेल्वे १० हजार ७१३, मोर्शी १० हजार ७८१, वरूड ९ हजार ४४७, अंंजनगाव सुर्जी १० हजार १४४, अचलपूर ८ हजार ७२८, दर्यापूर ८ हजार ६३५, चांदूर बाजार १० हजार ८५१, धारणी ७ हजार २९० व चिखलदरा तालुक्यात ५ हजार ६२५ क्विंटल असे एकूण १ लाख ५० हजार २९ क्विंटल बियाण्यांची गरज आहे.
यंदाच्या हंगामात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे असल्यामुळे सर्वाधिक १,३२,५०० क्विंटल बियाणे लागणार आहे. संकरित कापूस ४,१६३ क्विंटल, सुधारित ६०० क्विंटल, तूर ६२४० क्विंटल, मूग १३८६ क्विंटल, संकरित ज्वार २,८०० क्विंटल, तर उडदाचे २३४० क्विंटल बियाणे लागणार आहे.
बीटीच्या ९.२५ लाख पाकिटांची मागणी
मागील हंगामात सर्वच कंपनीच्या वाणावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा विशिष्ट अशा कंपनीच्या वाणाची मागणी नाही. यंदा अमरावती तालुक्यात ४०६०० पाकिटे, भातकुली ३६०००, नांदगाव खंडेश्वर २२५००, चांदूर रेल्वे ३६१००, तिवसा ६७६००, धामणगाव रेल्वे १११५००, मोर्शी १०८५००, वरूड १३३०००, अंजनगाव सुर्जी ६७५००, अचलपूर ८४०००, दर्यापूर ८२०००, चांदूर बाजार ९५०००, धारणी ३६१००, चिखलदरा तालुक्यात ४६०० पाकिटांची आवश्यकता आहे.
यंदा १.०६ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांची गरज
यंदाच्या हंगामात १,०६,८२० मे. टन रासायनिक खतांची गरज आहे. यामध्ये सर्वाधिक युरिया ३४,१०० मे.टन, डीएपी १८,६६०, एमओपी ७,९६० मे. टन लागणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ८,५४६ मे.टन, भातकुली ५,८७५, नांदगाव खंडेश्वर ४,८०७, चांदूररेल्वे ५,३४१, धामणगाव रेल्वे ६,९४३, तिवसा ७,४७७, मोर्शी १०,६८२, वरूड १२,८९८, चांदूर बाजार ८,०१२, अचलपूर ११,२१६, ांजनगाव सुर्जी ९,०८०, दर्यापूर ९,६१४, धारणी ५,३४१ व चिखलदरा तालुक्यात १,०६८ मे.टन रासायनिक खतांची गरज आहे.

Web Title: Kharipala wants 1.51 lakh quintals of seed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.