गारपिटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करा - पालकमंत्री रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 08:13 PM2018-02-11T20:13:27+5:302018-02-11T20:20:49+5:30

अकोला : जिल्ह्यात रविवारी सकाळी काही तालुक्यांमध्ये वादळी वार्‍यासह झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी  जिल्हाधिकारी व कृषी अधिकार्‍यांशी चर्चा करून ज्या गावांत पिकांचे नुकसान झाले आहे, तेथे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.  

Immediate panchnama for damaged crops caused by hail - Dr. Ranjeet Patil | गारपिटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करा - पालकमंत्री रणजित पाटील

गारपिटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करा - पालकमंत्री रणजित पाटील

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी केली जिल्हाधिकारी व कृषी अधिकार्‍यांशी चर्चा महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकामार्फत तात्काळ पंचनामे करण्याचे दिले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात रविवारी सकाळी काही तालुक्यांमध्ये वादळी वार्‍यासह झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी  जिल्हाधिकारी व कृषी अधिकार्‍यांशी चर्चा करून ज्या गावांत पिकांचे नुकसान झाले आहे, तेथे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.  महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकामार्फत सर्वेक्षण करून तात्काळ पंचनामे करण्यासाठीच्या कामाला लागले. प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने कामाला लागावे, अशी सूचनाही त्यांनी केली.  

Web Title: Immediate panchnama for damaged crops caused by hail - Dr. Ranjeet Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.