तीन हजार भरा, कृषी संजीवनी योजनेत सहभागी व्हा!

By Atul.jaiswal | Published: November 23, 2017 01:50 PM2017-11-23T13:50:35+5:302017-11-23T13:56:10+5:30

अकोला : आता शेतकºयांना वीज बिलाची ३० हजार रुपये थकबाकी असल्यास सुरुवातीला तीन हजार रुपये, तसेच ३० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असल्यास पाच हजार रुपये भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे.

 Fill three thousand, join the Sanjeevani Krushi scheme! | तीन हजार भरा, कृषी संजीवनी योजनेत सहभागी व्हा!

तीन हजार भरा, कृषी संजीवनी योजनेत सहभागी व्हा!

googlenewsNext
ठळक मुद्देथकबाकीदार शेतकºयांना सवलत ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केला निर्णय

अकोला : कृषी पंपांच्या वीज बिलाची थकबाकी असणाºया शेतकºयांना थकबाकीमुक्त होण्यासाठी राज्य शासनाने आणलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेला शेतकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याच्या पृष्ठभूमीवर शासनाने या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकºयांना सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. आता शेतकºयांना वीज बिलाची ३० हजार रुपये थकबाकी असल्यास सुरुवातीला तीन हजार रुपये, तसेच ३० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असल्यास पाच हजार रुपये भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. थकबाकीदारांना ही सवलत देण्याचा निर्णय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी जाहीर केला. ही रक्कम ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत भरावयाची आहे. ज्या शेतकºयांना वीज देयकाची दुरुस्ती करावयाची आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक फिडरनिहाय वीज देयक दुरुस्ती शिबिराचे आयोजन १ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०१७ या कालावधीत महावितरणतर्फे करण्यात येणार आहे.
मुंबईत महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ऊर्जा सचिव अरविंद सिंह, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार व महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे उपस्थित होते. ज्या शेतकºयांचा वीज पुरवठा वीज बिलांचा भरणा न केल्यामुळे खंडित करण्यात आलेला आहे, अशा शेतकºयांनी पैसे भरताच त्यांचा वीज पुरवठा तत्काळ जोडण्यात येणार आहे, तसेच मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणाºया ज्या शेतकºयांना आपली देयके वाढून आली आहेत, असे वाटत असेल त्यांनी फिडरनिहाय आयोजित शिबिरात सहभाग घेऊन आपली देयके तपासून घ्यावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे.
कृषी पंपांना थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ ची घोषणा ३० आॅक्टोबर २०१७ ला ऊर्जा मंत्र्यांनी केली होती. या योजनेची मुदत ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत असून, या योजनेत सर्व शेतकºयांनी सहभागी होऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title:  Fill three thousand, join the Sanjeevani Krushi scheme!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.