अंगावर वीज पडून शेतकर्याचा मृत्यू
By Admin | Published: June 15, 2014 08:59 PM2014-06-15T20:59:15+5:302014-06-15T22:23:24+5:30
अंगावर वीज पडून आदिवासी शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना बार्शिटाकळी तालुक्यातील मुंगसाजी नगर येथे घडली.
सायखेड : अंगावर वीज पडून आदिवासी शेतकर्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बार्शिटाकळी तालुक्यातील मुंगसाजी नगर येथे शुक्र वार १३ जून रोजी सायंकाळी ५.00 वाजताच्या सुमारास घडली. तुळशीराम किसन लोखंडे (५५), असे मृतक शेतकर्याचे नाव आहे.
तुळशीराम लोखंडे हे शुक्र वार १३ जून रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या वडिलोपाजिर्त शेतामधील आंब्याच्या झाडाखाली बसले होते. त्यावेळी अचानक आभाळ दाटून आले आणि विजेचा कडकडाट सुरू झाला. त्यावेळी आंब्याच्या झाडाखाली बसलेले तुळशीराम लोखंडे यांच्या अंगावर एकाएकी वीज पडली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पांगराबंदी शेत शिवारातील काही शेतकरी वादळाने पडलेले आंबे वेचण्यासाठी तुळशीराम लोखंडे यांच्या शेतात गेले असता तुळशीराम लोखंडे यांचा मृतदेह तेथे पडून असल्याचे त्यांना दिसला. ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आल्यानंतर तुळशीराम लोखंडे यांचा मुलगा अनिल लोखंडे याने मालेगाव पोलिस स्टेशनला या संदर्भात फिर्याद दिली. त्यानुसार मालेगाव पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वाशिम येथे पाठविला. तुळशीराम लोखंडे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, असा आप्त परिवार आहे.