Lok Sabha Election 2019: अहमदनगरमधील नगरसेवक द्विधा मनस्थितीत : कोणता झेंडा घेऊ हाती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:38 AM2019-03-16T11:38:34+5:302019-03-16T12:24:18+5:30

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या मतदारसंघात येणाऱ्या महापालिका व सात पालिका नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे़

Ahmadnagar corporator in a state of ammunition: Which flag will take? | Lok Sabha Election 2019: अहमदनगरमधील नगरसेवक द्विधा मनस्थितीत : कोणता झेंडा घेऊ हाती ?

Lok Sabha Election 2019: अहमदनगरमधील नगरसेवक द्विधा मनस्थितीत : कोणता झेंडा घेऊ हाती ?

Next

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या मतदारसंघात येणाऱ्या महापालिका व सात पालिका नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे़ कोणता झेंडा घेऊ हाती, अशा द्विधा मनस्थितीत नगरसेवक आहेत़ त्यामुळे शहरी भागातील एक गठ्ठा मते पदरात पाडून घेण्यासाठी नगरसेवकांची मोट बांधण्याचे आव्हान स्थानिक नेत्यांसह उमेदवारांसमोर आहे़
लोकसभेची सर्वाधिक मते नगर शहरात आहेत़ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून डॉ़ विखे यांनी प्रथमच महापालिका निवडणुकीत लक्ष घातले़ पण, या निवडणुकीत त्यांना फारसे यश आले नाही़ काँग्रेसचे पाच नगरसेवक निवडून आले़ काँग्रेस आघाडीविरोधात सेना-भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढविली़ सेनेचे २४, तर भाजपाचे १४ नगरसेवक निवडून आले़ या निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली़ काँग्रेसचे डॉ़ विखे आता भाजपमध्ये आले आहेत़
भाजप प्रवेशानंतर विखे यांनी महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ असलेल्या सेनेशी जवळीक साधली़ अर्थात सेनेची मते, हा त्यामागील हेतू आहे़ राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक निवडून आले़ त्यांनी सत्ता स्थापनेत भाजपाला साथ दिली़ पण, ज्या नेतृत्वाने हा निर्णय घेतला, त्यांनाच आता राष्ट्रवादीकडून मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे़ त्यामुळे विखे की जगताप, असा पेच सर्वच नगरसेवकांसमोर आहे़
नगरपालिका नगरसेवकांचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही़ पारनेर नगरपालिकेत सेनेचे सर्वाधिक ९ नगरसेवक आहेत़ मात्र या भागाचे नेतृत्व करणारे सेनेचे निलेश लंके आता राष्ट्रवादीत आले आहेत़ त्यामुळे या तालुक्यातील राजकीय समीकरणेही बदललेली आहेत़ कर्जत नगरपालिकेत भाजपाचे सर्वाधिक १२ नगरसेवक आहेत़ काँग्रेसचे ४ , तर अपक्ष १ असे संख्याबळ आहे़ त्यामुळे कर्जत शहरात चमत्कार होईल, अशी स्थिती नाही़
श्रीगोंदा नगरपालिकेत भाजपाचे १३, राष्ट्रवादी २, काँग्रेस ४, असे संख्याबळ आहे़ या तालुक्यातून काँग्रेसच्या अनुराधा नागवडे यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे़ या निर्णयावरही बरेच काही अवलंबून असणार आहे़ जामखेडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीनंतर समीकरणे बदलली़ राष्ट्रवादीच्या १० नगरसेवकांनी कमळ हातामध्ये घेतले़ पण, दस्तुरखुद्द शरद पवारांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने या नगरसेवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे़ शेवगाव नगरपालिकेतही भाजपाचे १२, तर राष्ट्रवादीचे ८ नगरसेवक आहेत़ राहुरी नगरपालिकेत राष्ट्रवादीचे १६, तर विखे-कर्डिले परिवर्तन आघाडीचे ६ नगरसेवक आहेत़

Web Title: Ahmadnagar corporator in a state of ammunition: Which flag will take?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.