सत्तेची धुंदी चढलेल्या राज्य सरकारला जनताच खाली खेचेल - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 11:52 AM2023-05-29T11:52:45+5:302023-05-29T11:53:23+5:30

नुसता शड्डू ठोकून विकासाचे प्रश्न सुटत नाहीत

Ajit Pawar criticism is that the people will pull down the state government that has risen to power | सत्तेची धुंदी चढलेल्या राज्य सरकारला जनताच खाली खेचेल - अजित पवार

सत्तेची धुंदी चढलेल्या राज्य सरकारला जनताच खाली खेचेल - अजित पवार

googlenewsNext

सणबूर (सातारा) ‘आपली तब्येत काय, आपण करतोय काय? नुसता शड्डू ठोकून विकासाचे प्रश्न सुटत नाहीत. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्ष काढला, त्यांच्या नावावर मते मागून निवडून येऊन गद्दारी करून पन्नास खोके मिळविले. त्यांना यापुढे जनता माफ करणार नाही,’ असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.

तळमावले, ढेबेवाडी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा काळगाव फाटा येथील गणेश मंगल कार्यालयात झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी सभापती सत्यजीतसिंह पाटणकर, सारंग पाटील, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांची उपस्थिती होती.

अजित पवार म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या काळात राज्यात जनतेच्या हिताचे अनेक निर्णय झाले. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या काळातील कामे रद्द केली. आता फक्त जाहिरातबाजी करून जनतेची दिशाभूल करत आहेत. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी या जिल्ह्याने दोन खासदार, नऊ आमदार दिले; परंतु मध्यंतराच्या काळात अनेकांनी पक्ष सोडला. त्यामुळे आपल्या जागा कमी झाल्या, परंतु येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोणी गद्दारी करण्याचा अथवा पाय ओढण्याचा प्रयत्न करू नये.’

Web Title: Ajit Pawar criticism is that the people will pull down the state government that has risen to power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.